Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

आपला प्रवास सुरक्षित व्हावा,तर हे ४ इशारे मिळताच तुमच्या वाहनाचे टायर्स बदला.

  आपला प्रवास सुरक्षित व्हावा,तर हे ४ इशारे मिळताच तुमच्या वाहनाचे टायर्स बदला. एकल न्यूज़ : आपलं वाहनं दीर्घकाळ टिकावं, वाहनाचा परफॉर्मन्स ...

 आपला प्रवास सुरक्षित व्हावा,तर हे ४ इशारे मिळताच तुमच्या वाहनाचे टायर्स बदला.

आपला प्रवास सुरक्षित व्हावा,तर हे ४ इशारे मिळताच तुमच्या वाहनाचे टायर्स बदला.
एकल न्यूज़ : आपलं वाहनं दीर्घकाळ टिकावं, वाहनाचा परफॉर्मन्स आणि मायलेज कायम राहावं यासाठी आपण आपल्या वाहनाची काळजी घेतो. मेन्टेनन्स राखतो, वेळेवर सर्व्हिसिंग करतो, वेगवेगळे पार्ट्स नीट आहेत का ते तपासतो. मात्र या सगळ्यात वाहनाचा एक महत्त्वाचा भाग आपण दुर्लक्षित करतो. हा पार्ट म्हणजे वाहनाचे टायर्स. अगदी आपण घरच्या घरी वाहन धुतो तेव्हादेखील वाहनाच्या टायर्सकडे फारसं लक्ष देत नाही. मात्र ही खूप चुकीची बाब आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपलं वाहन आणि रस्ता या दोन गोष्टींशी जोडलेला एकमेव पार्ट असतो तो म्हणजे टायर. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी आपल्या वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत असणं खूप गरजेचं आहे. वेळोवेळी टायर तपासणे आणि इतर भागांइतकीच टायर्सची सुद्धा योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे. वाहनाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी वेळोवेळी टायर तपासायला हवेत, ते खराब झाले असतील तर ते बदलायला हवेत. वाहनांचे टायर्स कधी बदलायला हवेत, याची माहिती तुम्हाला नसेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. यात आम्ही तुम्हाला टायर्सच्या देखभालीसह टायर कधी बदलायला हवेत, याबाबतची माहिती देणार आहोत.
chaudhari yatra


अलाईन्मेंटची समस्या किंवा रोटेशनमधील खराबीमुळे टायर्सचं घर्षण होऊ लागतं. कंपन्यांनी सुचवलेल्या सूचना युजर मॅन्युअलमध्ये पाहायला मिळतील. खराब झालेलं सस्पेन्शन आणि चुकीच्या इन्फ्लेशन प्रेशसह टायर्सचा दीर्घकाळ वापर केल्याने देखील अनियमित ट्रेड वियर निर्माण होतो. यावेळी पॅच मार्क्स तयार होता. अशा स्थितीत देखील तुम्ही तुमचं वाहन चालवत राहिलात तर टायर फुटण्याची किंवा पंक्चर होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी टायर्स बदलून घेणं सर्वोत्तम पर्याय आहे. असे टायर्स दुरुस्त करण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं. टायर्स बदलताना व्हील्सची (चाकांची) अलाईन्मेंट देखील तपासून घ्यायला हवी.
pitambari


टायर्स कितीही मजबूत, चांगल्या दर्जाचे किंवा एखाद्या मोठ्या ब्रँडचे असले तरी टायर्सना एक आयुष्य असतं. त्यानंतर ते खराब होतात किंवा वापरण्यालायक राहात नाहीत. टायर्सचं आयुष्य साधारणपणे सहा ते सात वर्षांचं असतं. जरी तुमचं वाहन चांगलं चालत असलं तरी त्याचे टायर्स ६ ते ७ वर्षांनी बदलायला हवेत. तसेच टायर्समधील क्रॅक हे कोणत्याही ठिकाणच्या हवामानावर अवलंबून असतात. साधारणपणे, सहा ते सात वर्षे वापरल्यानंतर टायर फुटतात. जसजसा टायरचा रबर जुना होत जातो, तसतसा तो खराब होऊ लागतो, गुळगुळीत होऊ लागतो. तसेच हे टायर्स प्रवासादरम्यान, फुटण्याची शक्यता खूप जास्त असते.
amul


बल्ज किंवा बल्जेज म्हणजे टायर्समधील हवेचे फुगे. जर तुम्हाला साइडवॉल किंवा टायर ट्रेडजवळ काही फुगे दिसले तर समजून जा की तुमच्या वाहनाचं टायर खराब झालं आहे. वाहनाचे टायर्स अशा स्थितीत असूनही तुम्ही तुमचं वाहन घेऊन घराबाहेर पडलात तर प्रवासादरम्यान, टायर फुटण्याचे किंवा अपघाताचे चान्सेस वाढतात. त्यामुळे टायर्समध्ये अबनॉर्मल बल्जेज दिसले तर त्वरीत टायर्स बदलून घ्या. असे बल्जेज प्रामुख्याने जुन्या बाइकच्या टायर्समध्ये दिसतात. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलंत तर ही बाब तुमच्या जीवावर बेतू शकते. ड्रायव्हिंगच्या खराब सवयी किंवा कमी टायर प्रेशरमुळे देखील असू बल्जेज दिसू शकतात.
pitambari


टायर्सची स्थिती तपासणं खूप महत्वाचं आहे. ट्रेड्सचं पहिले काम कुठलं असेल तर ते म्हणजे ट्रॅक्शन सुधारण्यासाठी टायरच्या खालून पाणी वळवणे. यावरुन तपासलं जातं की, ओल्या रस्त्यांवर हायड्रोप्लॅनिंगपासून वाहने टिकून राहू शकतील की नाही. टायर्समध्ये एक विशिष्ट डेप्थ असणं गरजेचं असतं. नवीन टायर्स हे डीप ट्रेडसह येतात. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो. ट्रेड डेप्थ जोवर १/१७ इंच इतकी होत नाही तोवर परिस्थिती गंभीर नाही, असं आपण मानू शकतो. परंतु त्यानंतर मात्र तुम्ही टायर्स बदलणं योग्य ठरेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place