Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

श्रावण सुरू होण्याआधीच भाज्यांचे दर कडाडले; गृहिणींचे बजेट कोलमडले.

 श्रावण सुरू होण्याआधीच भाज्यांचे दर कडाडले;  गृहिणींचे बजेट कोलमडले. नवी मुंबई प्रतिनिधी : सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत ...

 श्रावण सुरू होण्याआधीच भाज्यांचे दर कडाडले;  गृहिणींचे बजेट कोलमडले.

श्रावण सुरू होण्याआधीच भाज्यांचे दर कडाडले;  गृहिणींचे बजेट कोलमडले

नवी मुंबई प्रतिनिधी : सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत असून, यामुळे मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. जो काही भाजीपाला येत आहे, त्यात पाण्याने भिजलेल्या भाजीपाल्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातून होणारी भाज्यांची मागणी पूर्ण होत नाही. परिणामी भाजीपाल्याच्या दरात वाढ होत असून, या आठवड्यात अनेक भाज्या घाऊक बाजारातच ६० ते ८० रुपये किलोच्या घरात पोहचल्या आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो भाजीसाठी १०० ते १२० रुपये मोजावे लागत आहेत.

pitambari


पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातच भाजीपाला भिजून पॅकिंग होत आहे. तिथून मुंबईच्या बाजारात आणण्यासाठी हा भाजीपाला गाडीतून आणला जातो. मुंबईतील घाऊक बाजारात माल पोहचेपर्यंत तीन ते चार तास जातात. भिजलेला असल्याने गाडीत हा माल खराब व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सध्या घाऊक भाजीपाला बाजारात चांगला भाजीपाला कमी प्रमाणात दिसत आहे. पाऊस असल्याने शेतकऱ्यांना शेतात भाजीपाला काढायला, त्याची पॅकिंग करायला मजूर मिळत नाहीत. पावसात भिजत काम करायला कामगार मजूर येत नाहीत. त्यामुळे आधीच मालाची आवक कमी होत आहे, त्यातच ओला असल्याने माल खराब होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान होत आहे.

pitambari


सध्याचे घाऊक दर प्रतिकिलो


भेंडी ६० ते ७५ रु किलो
फरसबी ६० ते ८० रु किलो
गवार ५० ते ८० रु किलो
घेवडा ४० ते ६०
ढोबळी मिरची ४० ते ६०
हिरवा वाटाणा ८० ते १००
वालवड ५० ते ६०
चवळी शेंग ३५ ते ५०
हिरवी मिरची ५० ते ५५ रु किलो




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place